2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभव ; देवेंद्र फडणवीसांचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक कारणांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमातून विरोधीपक्षनेते देवदेन्द्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारला इशारा दिल्यानंतर आज त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धेवेळी एक सूचक असे विधान केले. “बुद्धिबळाच्या चालीप्रमाणेच राजकारणातही दक्ष राहावे लागते. आम्ही सुद्धा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभूत झालो, असे फडणवीस यांनी म्हंटले.

पुण्यात नुकतीच एक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक असे विधान केले. “बुद्धिबळ खेळताना त्यातील चालीप्रमाणेच राजकारणातही डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागते. एकही चाल चुकली तर पराभव ठरलेलाच असतो. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभूत झालो, असे फडणवीस यांनी म्हंटले.

फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या झालेल्या पराभवाबात आज पुन्हा सूचक विधान केले. आता आत्याच्या या विधानावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिल्या जाणार हे पहावे लागणार आहे.

Leave a Comment