आदर्शच अपमानित होत असतील तर संमेलनात जाऊन तरी काय करायचे?; फडणवीसांची संमेलनाकडे पाठ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलनहि आहे. मात्र, त्यांनी त्या संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. याबाबत फडणवीसांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत मराठी साहित्य संमेलनाबाबत मनात असलेल्या नाराजीबाबात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच.पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव.

केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Leave a Comment