Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हत्येचा कट? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Dhananjay Munde । महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत असणारे नाव म्हणजे धनंजय मुंडे. खास करून मागील काही वर्षात तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दल महाराष्ट्रात नकारात्मक वातावरण निर्माण केलं केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेचाच हात नाही ना? अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. आता ते प्रकरण कुठं तरी निवळत असताना खुद्द धनंजय मुंडे यांच्याच हत्येचा प्लॅन करण्यात आला होता अशी खळबळजनक माहिती गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एका जाहीर सभेत दिली आहे. गुट्टे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले रत्नाकर गुट्टे ? Dhananjay Munde

गंगाखेडमधील भाषणात बोलताना आमदार गुट्टे यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना म्हंटले की, ‘धनूभाऊ, (Dhananjay Munde) तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी हे सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे.

कोण होते भय्यूजी महाराज ?

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी आत्महत्या केली होती. पत्नीच्या निधनानंतर एकाकीपणा जाणवत असल्याने आणि दुसऱ्या लग्नावरुन मुलीची नाराजी असल्यामुळे भय्यू महाराजा तणावाखाली असल्याचं बोललं जात होतं. १२ जून २०१८ रोजी ते त्यांच्या ‘सिल्व्हर स्प्रिंग्ज’ निवासस्थानी होते. याच दिवशी त्यांची मुलगी कुहू पुण्याहून इंदूरला येणार होती. तिची खोली अस्ताव्यस्त असल्याचे पाहून भय्यूजी महाराज आपल्या नोकरांना ओरडले आणि खोली नीट आवरायला सांगितली. यावेळी त्यांची पत्नीही घरी नव्हती. काही वेळाने महाराजांनी आपल्या मुलीच्या खोलीतच स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. भय्यूजी महाराज यांनी सुरुवातीला मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावले. त्यानंतर त्यांनी अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला.भय्यूजींनी महाराष्ट्रात अण्णा महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने ते लवकरच प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘राष्ट्रीय संत’ म्हणून घोषित केले होते. मात्र सगळं काही व्यवस्थित वाटत असतानाच त्यांनी स्वतःवर गोळी मारून जीव संपवला. आज रत्नाकर गुट्टे यांच्या दाव्यानंतर भय्यूजी महाराज यांच्या आठवणी ताज्या झाल्या.