मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात (Accident) घडला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे.

रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, अ‍ॅपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये रिक्षा आणि क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.

तिन्ही गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर चक्क क्रेनच्या सहाय्याने या गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हा अपघात (Accident) किती भयंकर होता ते. या अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातातील जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर तातडीने अपघातग्रस्तगाड्या महामार्गावरुन हटवण्यात आल्या आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Leave a Comment