भावाच्या लग्नात हवी ती चप्पल मिळाली नाही म्हणून बहिणीने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवरदेवाच्या एकुलत्या एका बहिणीने भावाची वरात निघण्यागोदर विष खाऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता.

काय आहे प्रकरण ?
बहिणीला भावाच्या वरातीत जाण्यासाठी आवडत्या चप्पल घेऊन दिल्या नव्हत्या, म्हणून ती रुसली होती. घटनेच्या दिवशी घरात लग्नापूर्वीचे विधी सुरू होते. घरातील सदस्यांसाठी कपडे आदी वस्तू खरेदी केल्या होत्या. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे वडील मुलीला तिच्या आवडीच्या चपला घेऊन देऊ शकले नाहीत. मात्र वडिलांनी शनिवारी सकाळी चप्पल देण्याचे वचन या मुलीला दिले होते. मात्र या मुलीला घरच्यांचे तिच्याकडे होणारे दुर्लक्ष सहन झाले नाही म्हणून तिने रागाच्या भरात विष घेतले.

विष घेतल्यानंतर या तरुणीला अस्वस्थ होऊ लागले. यानंतर त्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला.घटनेच्या दुसऱ्या दिवशी या तरुणीच्या भावाची वरात निघणार होती. आदल्या रात्री घरात लग्नापूर्वीचे विधी होते. भावाच्या लग्नात तिला हवी तशी चप्पल मिळाली नव्हती. आज तिला चप्पल घेऊन देणार होतो, मात्र त्यापूर्वीच तिने विष खाऊन आत्महत्या केली. अशी माहिती मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. छोट्या कारणावरून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Comment