मैत्रीच्या नात्याला काळिमा ! मित्रानेच केला मित्राचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मित्राने फोन करुन विद्यापीठातील लेणीजवळ भेटायला बोलावले, अन् त्याच्याशी भांडण करत चक्क चाकूने वार केले. हा गंभीर प्रकार २ ऑक्टोंबरच्या पहाटे दीड ते पावणे दोनच्या सुमारास विद्यापीठातील लेणीजवळ घडला. मयूर भास्कर आडोळे ऊर्फ नन्या (रा. श्रीकृष्ण मंदीराजवळ, बेगमपूरा) असे त्या चाकूने वार करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. एकंदरीतच या घटनेमुळे मित्राच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेला आहे.

याप्रकरणी फिर्यादी सम्राट सुरेश वानखेडे (२४, रा. नंदनवन कॉलनी) आणि मयूर ऊर्फ नन्या हे एकमेकांचे मित्र आहेत. दोन ऑक्टोंबर रोजी नन्याने सम्राटला फोन केला आणि विद्यापीठातील बौध्द लेणीजवळ भेटण्यासाठी बोलवले. दरम्यान सम्राट हा मित्रासोबत गेला असता, नन्या याने ‘तु माझ्याबद्दल पोरांना काय सांगत असतो?’ असे म्हणत सम्राटला हाताचापटाने मारहाण करण्यास सुरु केली. दरम्यान सम्राट हा समजावून सांगत असतानाच नन्याने कंबरेमध्ये लावलेला धारधार चाकू काढुन सम्राटच्या डाव्या बरगडीमध्ये खुपसला. यात सम्राट गंभीर जखमी होत कोसळला. सम्राटच्या इतर मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी) येथे उपचारासाटी दाखल केले. सम्राट हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी उपनिरीक्षक ज्योती गात यांनी गुन्हा दाखल केला. नन्या याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने मयूर ऊर्फ नन्याला बुधवारपर्यंत (ता.६) पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शेख करत आहेत.

Leave a Comment