पाणी कमी पिल्याने वाढू शकते गोड खाण्याची सवय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । साखरेचे प्रमाण जर आपल्या शरीरात जास्त झाले तर त्यापासून आपल्याला धोका असतो. त्यामुळे फॅट चे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. लहान मुलांना साखर आणि गोड पदार्थ खायला खूप आवडतात . परंतु त्यामुळे त्याची तब्बेत हि बिघडू शकते. तसेच मोठ्याना सुद्धा सारखे गोड पदार्थ खाणे आवडत असते. पण हि सवय काही प्रमाणात आपल्याला धोकादायक ठरू शकते. याची जाणीव खूप कमी लोकांना असते. मधुमेही लोकांनी तर पूर्णतः गोड खाणे टाळले पाहिजे. सतत गोड खाण्याची सवय आहे ती कोणत्या गोष्टीमुळे वाढते आहे त्याबद्धल आपण जाणून घेऊया

— सतत गोड खाण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी सी व्हेजिटेबल फूड जास्त प्रमाणात खावे म्हणजे सारखे सारखे गोड खाण्याची इच्छा होणार नाही.

— शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास साखर खावीशी वाटते म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते.

— बराच वेळ जर आपले शरीर उपाशी असेल तर शरीरातून साखरेची मागणी होते. त्यावेळी साखर खाण्याची इच्छा होते.

— आपल्या शरीराला जेवढ्या अन्नाची गरज असते ते अन्न खाताना विभागून खाल्ले जावे कारण सतत भुकेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

हे लक्षात ठेवा कि, साखरेचे प्रमाण हे नियंत्रित ठेवले पाहिजे. साखरेचे प्रमाण सुरुवातीपासून जर नियंत्रित ठेवायचे असेल तर गोड खाण्यावर ताबा मिळवला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment