EESL सुरू करणार ग्रामीण उजाला हा कार्यक्रम, १० रुपयांत देणार LED बल्ब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि (ईईएसएल) आता लवकरच वीज बिल कमी करण्याच्या माध्यमातून गावांमध्ये ऊर्जा दक्षता नेण्यासाठी आणि लोकांची बचत वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामीण उजाला हा नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले की, या अंतर्गत गावांमध्ये प्रति कुटूंब दहा रुपये दराने 3 ते 4 एलईडी बल्बचे वितरण केले जाईल. त्यांनी सांगितले की, देशभरातील सुमारे 15 कोटी ग्रामीण कुटुंबांमध्ये एलईडी बल्बचे वितरण केले जाईल.

ऊर्जा मंत्रालयांतर्गत एनटीपीसी, पीएफसी, आरईसी आणि पॉवरग्रीड या संयुक्त उद्यम कंपनी ईईएसएल योजनेत सुमारे 50 कोटी एलईडी बल्बचे वितरण केले जाईल. यामुळे 12,000 मेगावॅट विजेची बचत होईल, तर कार्बन उत्सर्जन वर्षाकाठी 50 दशलक्ष टनांनी कमी होईल. या उजाला कार्यक्रमांतर्गत कंपनीने यापूर्वी प्रति बल्ब 70 रुपये दराने 36 कोटीहून अधिक लोकांना या एलईडी बल्बचे वितरण केले आहे मात्र यापैकी फक्त 20 टक्केच बल्ब हे ग्रामीण भागात वितरित करण्यात आले आहेत.

एलईडी बल्बचे वितरण 10 रुपयांमध्ये होईल
कुमार म्हणाले, आम्ही लवकरच ग्रामीण उजाला हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्याच्या रूपरेषेवर अद्याप काम चालू आहे. त्याअंतर्गत गावात प्रति कुटूंब दहा रुपये दराने तीन ते चार एलईडी बल्बचे वाटप केले जाईल. ही योजना येत्या तीन ते सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने देशातील सर्व खेड्यांमध्ये राबविली जाईल. ते म्हणाले, या कार्यक्रमासाठी केंद्र किंवा राज्यांकडून कोणतेही अनुदान घेतले जाणार नाही आणि जो काही खर्च असेल तो ईईएसएल स्वतःच करेल. आम्ही कार्बन ट्रेडिंगद्वारे हा खर्च वसूल करू.

एलईडी बल्बऐवजी तीन जुने बल्ब द्यावे लागतील
कुमार म्हणाले की, जर आम्ही खेड्यात प्रत्येक कुटुंबात तीन एलईडी बल्ब दिले तर त्याऐवजी आम्ही तीन जुने बल्ब घेऊ. आम्ही त्यांना गोळा करू, किती बल्ब आले आणि ते किती जुने आहे यावर लक्ष ठेवू. मग त्यांना नष्ट केले जाईल. हे सर्व संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेनुसार (हवामान बदलावरील यूएन ड्राफ्ट कन्व्हेन्शन अंतर्गत क्लीन डेव्हलपमेंट सिस्टम अंतर्गत) होते आणि आम्हाला त्यासाठी कार्बन प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपतरी विकसीत देशांमध्ये मागणी आहे जिथे आम्ही त्यांना विकू आणि एलईडी बल्बची किंमत वसूल करू.

कंपनी आधीपासूनच उजाला कार्यक्रम चालवित आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही याआधी या उजाला कार्यक्रमा अंतर्गत 70 रुपये दराने एलईडी बल्बचे वितरण केले आहे. पण आम्ही पाहिले की 36 कोटी एलईडी बल्बपैकी २० टक्के गावे सहभागी होती. यामागील एक कारण त्याची किंमत असू शकते. खेड्यांमध्ये 70 रुपयेही जास्त आहेत. पुडुचेरी, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश यांनी एलईडी बल्बवर अनुदान देताना दहा रुपये दराने विक्री केली. या राज्यांत 95 टक्के बल्ब गावात पोहोचले आहेत. हे पाहता आम्ही हा कार्यक्रम बनवित आहोत.

25 ते 30 हजार कोटी रुपयांची होईल वार्षिक बचत
यातून होणाऱ्या लाभाबाबत ते म्हणाले की, देशभरातील खेड्यांमध्ये 50 कोटी उच्च प्रतीच्या एलईडी बल्बचे वितरण केल्याने विजेची जास्तीत जास्त मागणी 12,000 मेगावॅटने घटेल तर ग्राहकांच्याही विजेच्या बिलात 25,000 ते 30,000 कोटी रुपयांची बचत होईल. या व्यतिरिक्त कार्बन उत्सर्जन वर्षाकाठी 5 कोटी टनांनी कमी होईल, तसेच टिकाऊ व उत्तम जीवनाला चालना देताना वीज बिलाच्या रूपात लोकांच्या पैशाची बचत होणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. तसेच, एलईडी बल्बची मागणी वाढल्यास गुंतवणूकही वाढेल.

एनर्जी सेव्हिंग ट्यूब लाइट्स आणि फॅन्स देखील उपलब्ध असतील
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कार्बन ट्रेडिंग आणि प्रमाणपत्रांचे प्रकरण हे संयुक्त राष्ट्रांशी संबंधित आहे. यासाठी थोडा वेळ लागतो. पण प्रक्रिया सुरू आहे. दीड महिन्यात तेथून मान्यता मिळेल अशी आमची आशा आहे. कुमार म्हणाले की, जर हा कार्यक्रम यशस्वी झाला तर आम्ही या मॉडेलवर खेड्यात स्वस्त दरात एनर्जी सेव्हिंग ट्यूब लाइट्स आणि फॅन्स देखील देऊ.

एलईडी बल्ब व्यतिरिक्त, ईईएसएलने एलईडी बल्ब व्यतिरिक्त एनर्जी सेव्हिंग ट्यूब लाइट्स आणि फॅन्स चे वितरण देखील केले आहे. त्याच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये उजला व्यतिरिक्त एसएलएनपी (स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम), स्मार्ट मीटर, इलेक्ट्रिक व्हेईकल, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment