आयात शुल्कात कपात झाल्यानंतरही खाद्य तेलाच्या किंमतींबाबत दिलासा मिळण्याची आशा थोडी, यामागील कारणे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खाद्य तेलाच्या (Edible Oil) वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला त्रास होतो आहे. मोहरीचे तेल दुहेरी शतकाच्या मार्गावर आहे तर पाम तेल देखील एका वर्षात दुपटीने महाग झाले आहे.

किंमती खाली आणण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. आयात शुल्कात कपात केल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचे दर खाली येतील. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे फारसा फरक पडणार नाही. खरं तर खाद्य तेलांच्या किंमती वाढण्यामागील खरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलबिया पिकांच्या उत्पादनातील संकट. तसेच मागणी आणि पुरवठा यातील अंतर खूप मोठे आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत आपली देशांतर्गत गरज भागवण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करतो.

बायोडिझेलच्या (biodiesel) वापरामध्ये वाढ झाल्याने किंमती वाढल्या
जगात तेलबिया पिकांच्या (Oilseeds) उत्पादनाबाबत एक संकट आहे. दुष्काळामुळे अमेरिका आणि ब्राझीलमधून सोयाबीनचा पुरवठा कमी झाल्यामुळे हे घडले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने (US Department of Agriculture) म्हटले आहे की,” सप्टेंबरपर्यंत जगातील सोयाबीन साठा पाच वर्षाच्या 8.79 कोटी टनांच्या नीचांकावर जाईल. त्याचप्रमाणे कोरोनामुळे आग्नेय आशियाई देशांमध्ये पाम तेलाच्या वृक्षारोपणात (Plantation) अडथळा निर्माण झाल्यामुळे त्याचे दर वाढले. त्याच वेळी बायोडिझेलचा वापरही वाढत आहे. यामुळे जागतिक बाजारात खाद्य तेलांचे दर वाढले आहेत.”

सोया तेलाचा वायदा 70 टक्क्यांहून अधिकने वाढला आहे
सोया तेलाच्या वायद्यात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर मागील वर्षी पाम तेलाच्या किमतींमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली होती. जगभरात हे तेल सर्वाधिक वापरले जाते. उच्च जागतिक किमतींमुळे देशांतर्गत बाजारात पाम तेल आणि सोया तेलाचे दर एका वर्षात दुप्पट झाले आहेत.

क्रूड, सोन्याच्या आयातीनंतर खाद्यतेल तिसऱ्या क्रमांकावर आहे
खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारताचा आयात खर्च देखील वाढेल. कारण दरवर्षी खाद्यतेलांच्या आयातीवर भारत सरासरी 8.5 ते 10 अब्ज डॉलर्स खर्च करतो. क्रूड ऑइल आणि सोन्यानंतर खाद्यतेल ही तिसरी सर्वात मोठी आयात आयटम आहे. उद्योगांच्या अंदाजानुसार, भारतातील पाम तेलाची आयात केवळ दोन दशकांत 40 लाख टनांवरून 1.5 कोटी टनांपर्यंत वाढली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment