शेतकऱ्यांचे ६ फेब्रुवारीला ‘चक्का जाम’ आंदोलन; टिकैत यांनी केली ‘ही’ हटके घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळं कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलं आहे. येत्या ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून ३ तासांकरिता चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. भारतीय किसान युनियनकडून चक्का जाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांकडून ६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का ३ तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. ‘चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,’ असं टिकैत यांनी सांगितलं.

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. दिल्लीच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यांची सुटका करण्याची मागणी टिकैत यांनी केली. शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment