फौजिया खान यांनी पेटवले ईव्हीएम मशीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | ‘संविधान बचाव, ईव्हीएम हटाव’ चा नारा देत सातारा येथे काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादीच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या हस्ते ई.व्ही.एम. मशीन पेटवून देण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे ‘संविधान बचाव, ई.व्ही.एम. हटाव’ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुरुषांच्या सोबतच राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चात भाजप शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘मनुस्मृती हटाव, देश बचाओ’ असे फलक झळकविण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, सातारा जिल्हा महिला कार्यध्यक्षा जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, प्रदेश सेवादल मुख्य संघटक राजेंद्र लावंघरे, पांडुरंग पोतेकर, दीपिका घाडगे, शाफिक शेख, भटके विमुक्त अध्यक्ष जाधव, संगीता देशमुख, प्रिया नाईक, रुपाली भिसे, वैशाली सुतार, संजय बनकर, बबन निकम, अरुण माने, बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment