आरटीओ कार्यालयात आग; अनेक गाड्या जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आरटीओ कार्यालयात अचानक लागलेल्या आगीत उभ्या अनेक भांगर वाहने जळून खाक झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. ही आग कचऱ्यामुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आज संध्याकाळी आरटीओ कार्यालयातील जप्त केलेल्या उभ्या वाहनांनी अचानक पेट घेतला. बघता बघता आगिने अनेक गाड्यांना वेढ्यात घेतले. आग वाढत जात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या दोन बंबाच्या साहाय्याने जवानांनी आग आटोक्यात आणली.अशी माहिती अग्निशमन प्रमुख सुरे यांनी दिली

तर या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांच्याशी संपर्क साधला असता मी सध्या बैठकीसाठी मुंबईला आहे, मला कळालेल्या माहिती नुसार तीन गाड्या जळाल्या अशी माहिती दिली.

Leave a Comment