संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वऱ्हाडी मंडळींवर पाचगणीत गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 पाचगणी प्रतिनिधी | पाचगणी परिसरातील कासवंड या गावी लग्नाकरीता आलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी शहरातील एका कुटुंबातील लग्न पाचगणीत पार पडले. लग्नाला मुंबईतून वऱ्हाडी मंडळी आली होती. वधू पाचगणी शहरातील असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची सोय कासवंड येथील फार्म हाऊसवर करण्यात आली होती. मात्र, लग्ना झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळीनी रात्री संचारबंदीचे उल्लंघन केले.

मुंबईहुन पाचगणीत लग्नाकरीता आलेल्या लोकांनी करोना निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र, तसे जिल्हा ई पास अशा अटी व शर्तीचे पालन केले होते. मात्र, त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment