पूरग्रस्तांनी खचून जावू नये महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तांबवे गावातील लोकांना पावसाळ्यात पूराचा नेहमीच सामना करावा लागत आहे. तरीही येथील लोक धीराने तोंड देत आहेत. प्रशासनाने लोकांच्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी योग्य पध्दतीने लवकरात लवकर पंचनामे करावेत. पूरग्रस्तांनी खचून जावू नये महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील तांबवे गावात पुरग्रस्त, पडझड झालेल्या ठिकाणाला भेट दिली. यावेळी प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखाना रामचंद्र पाटील, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, उपसरपंच विजयसिंह पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, संभाजी पाटील, सदस्य धनंजय ताटे व तांबवे ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील म्हणाले, तांबवे- सुपने भागात ज्या कुटुंबाना तसेच शेतीला फटका बसलेला आहे. तेथील एकही कुटुंब प्रशासनाने चुकवू नये. प्रशासनाने लोकांच्यावर हे मोठे संकट आलेले आहे. तसेच प्रत्येक वर्षी आमच्या गावाला पूराचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here