राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला आणि युवकांवर भर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा शेती क्षेत्र आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेऊन काढण्यात आल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. जाहीरनामा समिताचे प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.

तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार असल्याचे सांगत समाजातल्या सर्व लोकांशी चर्चा करुन तिहेरी तलाकवर निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला आणि युवकांवर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती तसेच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पीपीपी मॉडेलला प्रोत्साहन देण्यात येईल असे म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांसदर्भात महत्त्वाच्या घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.

शेतमजुरांना नरेगा योजनेतून मदत आणि शेतीला लागणारे साहित्य जीएसटीतून मुक्त करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात युवकांनाही केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शहरातील पदवीधरांना १०० दिवसाची नोकरीची हमी यात देण्यात आली आहे. मुलींना शिशुवर्गापासून पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण मोफत देणार असल्याचेही यात म्हटले आहे. नोटबंदीनंतर किती नोकऱ्या गेल्या त्याची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

इतर महत्वाचे –

दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून निर्घृण खून

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचे बोगस अर्ज देऊन मोठी फसवणूक…

विशाल पाटील यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू…

Leave a Comment