लग्नानंतर 7 तास पण नाही टिकले 7 जन्माचे नाते; लग्नमंडपातुनच ‘यासाठी’ नवरीने काढला पळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा प्रेमाचे भूत डोक्यावर चढते तेव्हा कुटुंब आणि सर्व लोक शत्रू असल्याचे दिसते. प्रियसी तिच्या प्रियकराला मिळवण्यासाठी कुठल्याही स्थराला जायला तयार असते. सात जन्म सोबत असण्याच्या आश्वासनासह घेतलेले सात फेरे सात तासही टिकू शकले नाहीत. नवीन नवविवाहित वधू लग्नाच्या 2 तासातच घरातुन पळून गेली आणि लग्न स्वीकारण्यास नकार देऊन दुमका नगर पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने आपली प्रेमकथा पोलिसांना सांगून, आपल्याला पतीबरोबर राहायचे नाही. आणि फक्त तिच्या प्रियकराकडे राहणार असल्याचे सांगितले. पोलिसांनासुद्धा यावर काय भूमिका घ्यावी यावर बराच वेळ विचार करावा लागला.

दुमका शहरातील एका बँकेच्या कर्मचाऱ्याचा विवाह शेजारच्या शहरातील एका युवतीशी विवाह झाला. लग्नाचा संपूर्ण सोहळा पार पडल्यानंतर वधू दोन तासानंतर पळून गेली आणि एकटी सिटी स्टेशनकडे गेली. आणि स्टेशन प्रभारी देवव्रत पोद्दार यांना सांगितले की, हे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध आहे. ती आपल्या पतीबरोबर राहू शकत नाही. तिला पहिल्या प्रियकराबरोबर रहायचे आहे.

स्टेशन प्रभारी देवव्रत पोद्दार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुलगी म्हणते की हे लग्न तिच्या इच्छेविरूद्ध केले गेले आहे. म्हणून ती तिच्या पतीबरोबर राहणार नाही. दोन्ही बाजूंनी घटस्फोट घेण्यासही मान्य केले आहे. मुलीशी बोलताना तिच्या दुसर्‍या युवकाशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या तिला माहेरी पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment