अकोल्यातील मारोडा गावच्या निर्भयाला न्याय द्या! अचलपूर, परतवाड्यामध्ये बलात्काराचे संतप्त पडसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अकोला जिल्ह्यातील दहीहांडा गावामधील तरुणीवर गावातील गावगुंडांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बुधवारी अचलपूर, परतवाड्यात  नागरिकांनी मोर्चा काढला होता.

बलात्कार आणि हत्येचा अशा घृणास्पद प्रकारावर शासनाने आतापर्यंत गांभीर्याने विचार केला नाही असा आरोप यावेळी नागरिकांनी केला. सोबतच लवकरात लवकर शासनाने पीडितेला न्याय द्यावा, तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी अशा स्वरूपात आपल्या संतप्त प्रक्रिया प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

या घटनेतील मृत पीडितेला न्याय आणि दोषींना फाशी द्यावी अशा मागणीचे निवेदन मोर्च्यातील सहभागी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले. निवेदन देते वेळी अचलपूर परतवाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment