गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; Facebook पोस्टद्वारे केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे पोलिसांनी काल पडळकर यांच्या विरोधात कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून त्यांनी अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर करावे, अशी महत्वाची मागणी केली आहे. तसेच कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार? मुघलशाही कि होळकरशाहीचा? असा सवाल विचारला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल.

https://www.facebook.com/watch/?v=557967785740884

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असेल कि शेकडो हिंदूंचा बळी घेणाऱ्या बॉम्बब्लॉस्टचा मुख्य सूत्रधार तसेच दौड इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदारी असणारा नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्याबाईंच्या भक्तांना चौंडी येथे येण्यापासून राखले. यांना हिंदमाता राजमाता यांची जयंती म्हणजे स्वताच्या नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेन्ट वाटतो काय?

जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत मंदिरे लुटली जात होती त्यावेळी अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले. म्हणून तमाम अहिलाप्रेमींची लोकभावना आहे कि हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे, त्यानुसार आपणास मी पत्र लिहले असल्याचे पडळकर यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment