चिनी स्मार्टफोनबाबत भारत सरकारची कठोर भूमिका, आता प्री इन्स्टॉल अ‍ॅप्स आणि कॉम्पोनन्ट तपासले जाणार – Reports

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या वर्षीपासून लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन (India-China) यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान सुमारे 220 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकार आता चीनी मोबाइल कंपन्यांच्या स्मार्टफोनबाबत कडक भूमिका घेणार आहे. असे वृत्त आले आहे की, भारत सरकार चीनी स्मार्टफोनचे भाग आणि प्री इन्स्टॉल अ‍ॅप्सची तपासणी करेल. द मॉर्निंग कॉन्टेक्स्टमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्स नुसार, भारत सरकारने चीनी स्मार्टफोन कंपन्यांना त्यांच्या फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉम्पोनन्टसची आणि डेटाची माहिती मागितली आहे.

काउंटर पॉइंट रिसर्चच्या आकडेवारीनुसार, चिनी स्मार्टफोन कंपन्या विवो, ओप्पो, शाओमी आणि वनप्लस यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या कंपन्यांचा भारतीय मोबाईल मार्केटमध्ये 50% पेक्षा जास्त वाटा आहे, म्हणजेच भारतात वापरला जाणारा प्रत्येक फोन या कंपन्यांचा आहे.

या कंपन्यांचे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सुरक्षित आहेत की नाही हे जाणून घेणे हा सरकारच्या या हालचालीचा उद्देश आहे. असे मानले जाते की, चीनी स्मार्टफोनच्या डेटाबद्दल प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर भारत सरकार आणखी एक नोटीस पाठवेल, ज्यामध्ये या स्मार्टफोनच्या तपासाबाबत चर्चा होईल.

सध्या कोणतीही प्रतिक्रिया नाही
रिपोर्ट्स नुसार, वेबसाईटने या चीनी स्मार्टफोन कंपन्यांशी देखील संपर्क साधला आहे, परंतु रिपोर्ट लिहीपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

ET च्या रिपोर्ट्स नुसार, ही नवीन नोटीस भारतातील चिनी कंपन्यांविरोधातील मोठ्या कारवाईचा भाग असेल अशी अपेक्षा आहे. हे चीनच्या Huawei आणि ZTE सारख्या टेलिकॉम कंपन्याचे कॉम्पोनन्टस सरकारच्या तपासाशी सुसंगत असू शकतात. रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, केवळ हार्डवेअरच नाही तर सॉफ्टवेअर डिटेल्स, विशेषत: चीनी स्मार्टफोनवरील प्री इन्स्टॉल अ‍ॅप्स देखील तपासणीखाली येऊ शकतील.

Leave a Comment