Government Scheme | शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार 1 लाख 25 हजार रुपये; जाणून घ्या सरकारची नवी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Scheme | शेती हा आपल्या भारतातील अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. समाजातील प्रत्येक घटकाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार करून सरकारकडून योजना (Government Scheme) राबवल्या जातात. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची मदत झालेली आहे.

आता देखील शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सौर ऊर्जा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम सूर्य घरी योजना आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी योजना या महत्त्वाच्या योजना आहेत. सरकारच्या या योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची योजना आहे. नुकताच योजनेचा दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपली जमीन सरकारला भाड्याने देऊन प्रतिहेक्टरी वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसे कमावू शकतात. त्यामुळे घरबसल्या पैसे कमावण्याची ही शेतकऱ्यांकडे एक मोठी संधी आहे.

या योजनेचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन सरकारला भाड्याने द्यावी लागेल. आणि प्रतिहेक्टरी वर्षाला सरकारकडून तुम्हाला 1 लाख 25 हजार रुपये भाडे मिळून मिळेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची जमीन भाडे तत्वावर द्यावी लागणार आहे. या आधी या योजनेतून 75 हजार रुपये भाडे मिळत होते. परंतु आता सरकारने या रकमेत वाढ केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये वर्षाला मिळतात.

या भाड्यामध्ये दरवर्षी 3 टक्क्यांनी वाढ होत असते. त्यामुळे तुम्ही शेतीशी संबंधित कुठलेही काम न करता. तुमची शेती केवळ भाड्याने देऊन देखील खूप चांगला पैसा कमवू शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा 20 पुरवठा करणे. हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजेच सरकारकडून आपल्याला या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. आणि पैसे देखील मिळणार आहे. या योजनेमध्ये आता सरकारी आणि खाजगी दोन्ही जमीन वापरता येते.

महावितरणाचे केंद्र आहेत म्हणजे सब स्टेशन असते. त्याच्या पाच किलोमीटरच्या परिघात राहणारे शेतकरी त्यांची जमीन भाड्याने देऊ शकतात. यामध्ये हे क्षेत्र किमान 3 एकर ते कमाल 50 एकर पर्यंत असणे गरजेचे आहे. अशाप्रकारे तुम्ही सरकारला तुमची जमीन भाड्यावर देऊन घरबसल्या पैसे कमावू शकतात.