14 कोटी शेतकर्‍यांसाठी सरकारची मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी दिली ‘ही’ भेट; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आज तिसरे मदत पॅकेज (Atmnirbhar Bharat package 3.0) जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये सरकारने रोजगार, शेतकरी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशातील 14 कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. फर्टिलायझर सब्सिडी (Fertilizer Subsidy) म्हणून सरकारने 65,000 कोटी रुपये जाहीर केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अलिकडील आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काळात अर्थव्यवस्थेत वेगवान रिकव्हरी होईल.

फर्टिलायझर सब्सिडीची घोषणा
कृषी क्षेत्राला दिलासा देताना अर्थमंत्र्यांनी आज फर्टिलायझर सब्सिडी (Fertilizer Subsidy) जाहीर केली आहे. फर्टिलायझर सब्सिडी म्हणून 65,000 कोटी रुपये देणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना माफक किंमतीत खत उपलब्ध होईल.

https://twitter.com/ANI/status/1326809281937616896?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1326809281937616896%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fmos-finance-anurag-thakur-announced-rs-65000-crores-for-fertilisers-to-farmers-ndss-3335615.html

14 कोटी शेतकर्‍यांना लाभ मिळेल
शेतकर्‍यांना सहजपणे खत मिळू शकेल यासाठी सरकारने खत अनुदानासाठी 65,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा 14 कोटी शेतकर्‍यांना होईल.

गरिबांसाठी ही विशेष घोषणा करण्यात आली
यापूर्वी सरकारने 116 जिल्ह्यातील स्थलांतरित कामगारांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. यासाठी सरकारने, 37,543 कोटी रुपये खर्च केले. ही योजना 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अतिरिक्त 10,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. सरकारने आयकर सवलत म्हणून ही घोषणा केली आहे. हाउसिंग क्षेत्रात, बिल्डर आणि खरेदीदार दोघांनाही हा लाभ मिळेल. तर घर विकताना सर्कल रेट आणि व्हॅल्यू रेटमध्ये 10 टक्के सूट वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे. म्हणजेच, घसरलेल्या मालमत्तेचे मूल्य असूनही, सर्कल रेटमुळे एखादे घर विकू शकले नाही तर 20 टक्के सूट आहे, जेणेकरून घर विकले जाऊ शकेल आणि लोकांना रजिस्ट्री मिळेल. ही योजना 30 जून 2021 पर्यंत लागू असेल.

या लोकांना आत्मनिर्भर भारत पॅकेजचा फायदा झाला
अर्थमंत्री म्हणाले की आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत घेतलेल्या निर्णयांचा कामगारांना मोठा फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नांनाही चांगला परिणाम मिळाला आहे. ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अंतर्गत ईसीएलजी योजनेंतर्गत 61 लाख लोकांना फायदा झाला आहे. यामध्ये 1.52 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले असून 2.05 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. ते म्हणाले की, प्राप्तिकर विभागाने सक्रियता आणि तेजी दाखविताना 1.32 लाख कोटींचा रिफंड दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment