ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगभरात ओमिक्रॉनची सतत वाढत असलेली प्रकरणे लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरील बंदी आणखी वाढवण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, कोविड-19 च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाण सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता बंदी पुन्हा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्याचा आंतरराष्ट्रीय कार्गो फ्लाइट्सवर परिणाम होणार नाही. DGCA ने मान्यता दिलेल्या फ्लाइटवरही ही बंदी लागू होणार नाही. यासोबतच एअर बबल अंतर्गत फ्लाइट्सवरही बंदी घालण्यात येणार नाही. यापूर्वी DGCA ने 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मार्च 2020 पासून फ्लाइट्स बंद आहेत
साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, 23 मार्च 2020 पासून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बंद आहेत. मात्र, गेल्या जुलै 2020 पासून, सुमारे 28 देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय पॅसेंजर फ्लाइट्स सुरू आहेत. कोरोना पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

20,000 कोटींचे नुकसान होऊ शकते
महामारीची तिसरी लाट आणि विमान इंधनाच्या (ATF) किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने चालू आर्थिक वर्षात विमान कंपन्यांचा तोटा 20,000 कोटींपर्यंत वाढू शकतो. क्रिसिलच्या मते, एअरलाइन्स चालू आर्थिक वर्षात त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 20,000 कोटी रुपयांच्या तोट्याकडे जात आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील 13,853 कोटी रुपयांच्या तुलनेत हा तोटा 44 टक्क्यांनी जास्त आहे. इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडियावर आधारित रिपोर्ट, जे मिळून 75 टक्के देशांतर्गत उड्डाणे करतात, असा इशारा दिला आहे की हा तोटा 2022-23 पर्यंत एअरलाइन्सच्या रिकव्हरीस उशीर करेल.

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 282970 नवीन रुग्ण आढळले आहेत. 441 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टची आतापर्यंत 8,961 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशातील दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 15.13 टक्के आहे. ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या 1831000 पर्यंत वाढली आहे, जी 232 दिवसांतील सर्वाधिक आहे.

Leave a Comment