भारतातील काम करणाऱ्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या आहे कर्जबाजारी, सुमारे 20 कोटी लोकांनी आतापर्यँत घेतले आहे कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एक काळ असा होता की, जेव्हा कुणाकडून कर्ज घेण्याविषयी ऐकले तेव्हा कुटुंबातील लोकं अस्वस्थ व्हायचे. कारण कर्ज घेऊन आपले छंद पूर्ण करणे योग्य मानले गेले नाही. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की, भारतातील निम्मी लोकसंख्या कर्जबाजारी आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने (CIC) केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे, ज्यात असे म्हटले आहे की, भारताच्या सुमारे 40 कोटी काम करणाऱ्या लोकसंख्येपैकी निम्मे लोक कर्जबाजारी आहेत, ज्यांनी कमीतकमी एक तरी कर्ज घेतले आहे किंवा त्यांच्या जवळ क्रेडिट कार्ड आहे.

या अहवालात म्हटले गेले आहे की, जानेवारी 2021 पर्यंत भारताची एकूण लोकसंख्या 139 कोटी होती तर त्यातील 20 कोटी लोकांनी लोन मार्केटमधून रिटेल लोन घेतले आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या दशकात अनेक बँकांनी रिटेल लोन्सना प्राधान्य दिले आहे, परंतु कोरोना साथी नंतर या विभागाच्या पुढील वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. CIC च्या आकडेवारीनुसार ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये 18-33 वयोगटातील लोकांमुळे लोन मार्केट वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 8 टक्के लोकांनी रिटेल लोन घेतलेले नाही.

नॉन-मेट्रो आणि नॉन-अर्बन भागातून कंझ्युमर लोनची वाढती मागणी
तज्ञ म्हणतात की,” मेट्रो आणि मोठ्या शहरांपेक्षा नॉन-अर्बन भागातून कंझ्युमर लोनची मागणी जास्त आहे. टियर -1 शहराबाहेर 70% कंझ्युमर लोन वितरित केले जात आहे. मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांकडील लोन साठीचे सर्चिंग 2.5 पट जास्त आहे. ट्रान्स युनियन सिबिल आणि गुगलच्या अभ्यासानुसार टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार टियर -3 शहरांमध्ये लोन साठीच्या सर्चिंगमध्ये 47 टक्के वाढ झाली आहे. त्यात टीयर -2 शहरांमध्ये 32 टक्के आणि टियर -4 शहरांमध्ये 28 टक्के वाढ झाली आहे.

बँकेच्या कर्जात वार्षिक आधारावर 5.74 टक्के वाढ झाली आणि डिपॉझिट्स 9.73 टक्के वाढली
बँकेच्या कर्जाबद्दल सांगायचे झाले तर 4 जून 2021 रोजी संपलेल्या पंधरवड्यात ते वार्षिक आधारावर 5.74 टक्क्यांनी वाढून 108.43 लाख कोटी रुपये झाले. त्याच वेळी डिपॉझिट्स 9.73 टक्क्यांनी वाढून 153.13 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी 5 जून 2020 रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकेचे कर्ज 102.55 लाख कोटी रुपये आणि डिपॉझिट्स 139.55 लाख कोटी रुपये होती. यापूर्वी 21 मे 2021 रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकेत पत 5.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर डिपॉझिट्स मध्ये 9.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय बँकेच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बँक पत 5.56 टक्क्यांनी आणि डिपॉझिट्स मध्ये 11.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment