महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाचां सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना हा चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावून चर्चा करणार आहेत. अस डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील संख्या तब्बल 15 हजार 541 इतकी आहे. यापैकी 2 हजार 819 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर 617 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. आणि कोरोनाचां जास्त फटका हा मुंबई आणि पुणे या दोन शहरांना बसला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा ही अतिशय सतर्कतेने काम करत आहेत. मात्र नागरीक याच गांभीर्य लक्षात घेत नसल्याने रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Leave a Comment