लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय ; राजेश टोपेंचं केंद्राला प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूचा विस्फोट मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता लसीकरणाच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असूनही त्यामानाने लसीचा पुरवठा होत नाही असा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर हर्षवर्धन यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावला. उलट महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही, एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिला जातो. त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे. असा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला होता.

दरम्यान हर्षवर्धन यांच्या आरोपांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. अस राजेश टोपे यांनी म्हंटल

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment