“तुम्ही राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये प्रचारादरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? असा सवाल करीत वादग्रस्त विधान केले आहे.

उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थिती लावत आहेत. आसामचे यावेळी मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून पुरावे मागितले जात आहेत. त्यांना आमचा सवाल आहे की, आमच्या सैनिकांनी संपावर गेल्याचे सांगितले असेल, तर पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,”

यावेळी शर्मा यांनी राहुल गांधी यांना सवालही विचारला आहे. “लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का?, तुमचा बिपिन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला पुरावा का हवा आहे? सैनिकांचा अपमान करणे बंद करा, असेहि शर्मा यांनी यावेळी म्हंटले.

Leave a Comment