गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – एकनाथ बागडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : संकलेन मुलाणी 

ज्या पोलीस दलाचा देशातच नव्हे; तर जगभरामध्ये दबदबा आहे. अशा पोलीस दलाला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले आहे. तसेच परमवीर सिंग यांनी आपल्या स्वार्थासाठी व आकसापोटी असे निर्णय दिल्याचे सांगून त्यांनी पोलीस दलाला बदनाम केले आहे. अशा भ्रष्ट गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी केली.

येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीसमोर रविवारी 21 रोजी सायंकाळी हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक श्री पेंढारकर, मुकुंद चरेगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.

शहराध्यक्ष बागडी म्हणाले, पोलीस दलाला बदनाम करण्याचे काम गृहमंत्र्यांनी व या सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच परमवीर सिंग यांच्यावरही आरोप करण्यात आले. परंतु, परमवीर सिंग यांनीच उघडपणे आपल्या गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी भाजपची आग्रही मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. पोलिसांचा अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, गली गली मे शोर है; महाआघाडी सरकार चोर है, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, खंडणीखोर सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment