चिपच्या तुटवड्याला कंपन्‍या कशा प्रकारे तोंड देत आहेत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टाटा आणि महिंद्रा अँड महिंद्रा सेमिकंडक्टरच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी स्वदेशी दृष्टिकोन स्वीकारत आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये चिप्सचा वापर कमी केला आहे. त्यांमध्ये चिपवर अवलंबून असणारे अनेक फीचर्स काढून टाकण्यात आले आहेत. यासह टाटा मोटर्सने चिप ऑप्टिमाइझ करण्यात यश मिळवले आहे. ऑप्टिमायझेशन म्हणजे एकाच चिपमधून अनेक गोष्टी करण्याचा उपाय. यामुळे चिपचा वापर कमी करण्यात यश आले आहे.

वाहनांचा वाढता वेटिंग पिरियड कमी करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी ही उपाययोजना केला आहे. मनी कंट्रोल डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या दोन कंपन्यांकडे सुमारे 3 लाख वाहनांसाठी ऑर्डर बुक करण्यात आली आहे. आता ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वाहनासाठी 12 महिने वाट पाहण्यास सांगितले जात आहे.

टाटांनी अवलंबली ‘ही’ पद्धत
देशातील तिसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने प्रति वाहन चिप्सचा वापर कमालीचा कमी केला आहे. त्यांनी आपल्या अनेक गाड्यांमध्ये असे केले आहे. मात्र, कंपनीचे अधिकारी कोणत्याही विशिष्ट मॉडेलबद्दल सांगत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की,”जागतिक स्तरावरील चिपचे संकट पाहता कंपनी त्यांच्या ऑप्टिमायझेशनवर म्हणजेच एका चिपमधून अनेक कामे घेण्यावर भर देत आहे.”

रिपोर्ट्स नुसार, टाटाचे प्रवासी वाहन व्यवसायाचे प्रमुख शैलेश चंद्र यांनी अलीकडेच एका कॉन्फरन्समध्ये सांगितले की,”वाहनाच्या एका कंपोनेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सची संख्या निम्मी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही स्टँडर्ड चिपऐवजी एप्लिकेशन आधारित चिप बनवण्यावर भर देत आहोत. यामुळे विशिष्ट फीचर्समध्ये वापरल्या जाणार्‍या चिप्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.”

JLR च्या कौशल्याचा फायदा घ्या
टाटा मोटर्स आपल्या नेक्स्ट जनरेशन कारमध्ये ब्रिटीश ब्रँड जॅग्वार आणि रँड रोव्हरचे कौशल्य वापरत आहे. टाटा मोटर्स देखील फ्युचर कार म्हणून इलेक्ट्रिक कारकडे खूप लक्ष देत आहे. मात्र इलेक्ट्रिक कार्सना पेट्रोलियम इंजिन असलेल्या कारपेक्षा जास्त चिप्स लागतात. यासंदर्भात चंद्रा पुढे म्हणाले की,”आम्ही आमची सेमीकंडक्टर स्ट्रॅटेजी बनवली आहे. या अंतर्गत अनेक पावले उचलली जात आहेत. आम्ही कारमधील चिप्सचा वापर यशस्वीपणे कमी केला आहे.”

टाटा मोटर्सवर चिप संकटाचा कमी परिणाम झाला आहे
कदाचित यामुळेच जगात सध्या सुरू असलेल्या सेमीकंडक्टर संकटाचा टाटा मोटर्सवर मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्रा अँड महिंद्रा या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा कमी परिणाम झाला आहे. सेमीकंडक्टरच्या समस्येमुळे अनेक कंपन्यांना त्यांची उत्पादन क्षमता कमी करावी लागली आहे.

महिंद्रा अशा प्रकारे कमतरता कमी करत आहे
देशातील आघाडीची SUV कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानेही या संकटाचा सामना करण्यासाठी सेमीकंडक्टरचा वापर कमी केला आहे. उदाहरणार्थ, कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या SUV XUV700 मध्ये काही चिप-आधारित फीचर्स काढून टाकले आहेत. या SUV मध्ये कंपनीने वायरलेस मोबाईल चार्जिंग फीचर काढून टाकले आहे. लॉन्चच्या वेळी हे फीचर होते मात्र आता ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये हे फीचर नाही.

XUV700 चे संपूर्ण फीचर पूर्ण करण्यासाठी 170 चिप्स आवश्यक आहेत
मनी कंट्रोलशी बोलताना महिंद्र अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की,”उच्च तंत्रज्ञान उत्पादनांसाठी सेमीकंडक्टरची मोठी कमतरता आहे. अशा परिस्थितीत आम्ही ग्राहकांना या फीचर्सशिवाय XUV700 खरेदी करण्याचा पर्याय देत आहोत. त्यासाठी आम्ही किंमतही कमी केली आहे.” ते पुढे म्हणाले की,”आम्ही ग्राहकांना यासाठी जबरदस्ती करत नाही. ते निवडणे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. महिंद्राच्या XUV700 चे संपूर्ण फीचर्स पूर्ण करण्यासाठी, 170 चिप्स आवश्यक आहेत. यामध्ये काही फीचर्स अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमशी जोडले गेलेले आहेत.”

Leave a Comment