पंधरा दिवस भाजी खाल्ली नाही तर कोणी मरणार नाही ; मनपा प्रशासक पांडेय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने गुरुवारपासून अंशतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जाधववाडीतील भाजी मंडईत मोठी गर्दी जमत असल्याने तिथून संसर्गाचे प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रशासनाने सात दिवस हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोकने व लोकांचे जीव वाचविण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंधरा दिवस कोणी भाजी खाल्ली नाही किंवा विकली नाही तर कोणी मरणार नाही असे उदगार मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी केले आहे.

धूत हॉस्पिटल मधील आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उदघाटन झाल्यानंतर पांडेय यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली ते म्हणाले, शहरात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे.आतापर्यंत ४० हजार लोकांना डोस दिले आहेत.सहा महिन्यात साडेचार लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.शहरात सुमारे साडेचार लाख कुटुंबे राहतात आतापर्यंत साडेचार लाख लोकांची करुणा चाचणी करण्यात आली.या सर्वांना लस दिली तर शहर सुरक्षित राहू शकेल.

मास्क न घालणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे एकेकाळी औरंगाबाद चाचणीत देशात एक नंबरला होते. आताही आपण राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहोत असा दावाही त्यांनी केला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment