जर तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असेल तर आता घाबरण्याची गरज नाही ! असे का ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत सरकार सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीजवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात येणार्‍या विधेयकांपैकी एक म्हणजे The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021 आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणार आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर हे विधेयक मंजूर झाल्यानंतर, कोणतीही व्यक्ती क्रिप्टोकरन्सीचे मायनिंग करू शकणार नाही. तसेच ते कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी करू शकणार नाही किंवा जनरेट करू शकणार नाही, होल्ड करू शकणार नाही की त्याची विक्रीही करू शकणार नाही. यानंतर ते याचे ट्रेडिंग करू शकणार नाही किंवा ते इतर कोणालाही इश्यू करू शकणार नाही, ट्रान्सफर करू शकणार नाही किंवा त्याला डिस्पोज करू शकणार नाही.

रिपोर्ट्स नुसार, सध्या ज्यांच्याकडे क्रिप्टोकरन्सी आहेत त्यांना त्यांच्या पोझिशन मधून बाहेर पडण्यासाठी एक विहित वेळ दिला जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडेही क्रिप्टोकरन्सी असेल तर तुम्ही ती आता विकू शकता किंवा सरकारने दिलेल्या वेळेत नंतर विकू शकता. सूत्रांचे म्हणणे आहे की,”ज्या लोकांनी आपले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये ठेवले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यामुळे सरकार वेळ देऊ शकते.”

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे ?
क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक डिसेंट्रलाइज्ड सिस्टीमआहे. यावर कोणतेही सरकार किंवा कंपनीचे नियंत्रण नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिस्ट्रिब्यूटेड सिस्टीमवर ट्रान्सफर केलेली क्रिप्टोकरन्सी अत्यंत सुरक्षित मानली जाते. तज्ञ म्हणतात की,”कोणीही ते हॅक करू शकत नाही आणि त्याच्या डेटाशी छेडछाड करणे शक्य नाही, कारण ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये जगभरातील कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसवर प्रत्येक माहिती उपलब्ध आहे. जर छेडछाड करायची असेल, तर जगभरातील सर्व ब्लॉकचेन-कनेक्टेड कॉम्प्युटर्स मध्ये बदल करावे लागतील, जे शक्य नाही.”

Leave a Comment