इंग्लंड बदला घेण्यासाठी खेळणार ‘ही’ मोठी चाल,गावसकरांनी दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याअगोदर एक धोक्याचा इशारा दिला आहे. भारताविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडकडून हिरवी खेळपट्टी तयार करण्यात येईल असे सुनिल गावसकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा इंग्लंडच्या टीमने भारतातल्या खेळपट्टीवर आक्षेप घेतले होता, तेव्हा आता इंग्लंडने खेळपट्टीवर गवत ठेवले तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया गावसकरांकडून देण्यात आली आहे.

काय म्हणाले सुनिल गावसकर
या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. त्यादरम्यान ‘भारतीय खेळपट्टीबाबत इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे भारतालाही इंग्लंडमध्ये फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर खेळावं लागू शकतं, पण भारतासाठी या गोष्टी अजिबात अडचणीच्या नाहीत. कारण भारताकडे असलेली फास्ट बॉलिंग या खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरेल, उलट इंग्लंडच्याच बॅट्समनना हिरवी खेळपट्टी अडचणीची ठरू शकते,’ असेदेखील सुनील गावसकर म्हणाले.

इंग्लंड दौऱ्यात भारताचा विजय होईल असे भाकीत सुनील गावसकर यांनी केले आहे. भारतीय टीम किती फरकाने जिंकेल, हे त्यांनी सांगितलं नाही. पण भारताकडे इतिहास घडवण्याची चांगली संधी आहे असा विश्वास सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी टीम इंडियाला सरावासाठी 6 आठवड्यांचा अवधी मिळणार आहे. यामुळे टीमसाठी सराव करायला आणि वातावरणाशी एकरूप व्हायला एवढा कालावधी भरपूर आहे. या वर्षाच्या इंग्लंडची टीम यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. यामध्ये 4 टेस्ट, 5 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज झाली होती. यामधील चेन्नईमध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच इंग्लंडने जिंकली होती. यानंतर बाकी टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता. या सिरीजदरम्यान इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी आणि माजी क्रिकेटपटूंनी भारताने स्पिनरना अनुकूल अशी खेळपट्टी बनवल्यामुळे भारतावर टीका करण्यात आली होती.

Leave a Comment