Indian Railways Rules : ट्रेन 3 तास उशीरा आल्यास तिकीटाचे पैसे होतात रिफंड; पहा काय आहे प्रोसेस?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. देशाच्या कोणत्याही भागातून कुठेही जायचं म्हंटल तरी सर्वसामान्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी आणि महत्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा प्रवास असल्याने रेल्वेला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्याचा काळ हा पावसाळ्याचा असून या दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द होत आहेत तर काही ठिकाणी रेल्वे उशिरा धावत आहेत. परंतु तुंम्हाला रेल्वेचा एक नियम (Indian Railways Rules) माहित आहे का? ज्यामधून जर तुमची ट्रेन ३ तास उशिरा आली तर तुम्हाला तिकिटाचे पैसे परत रिफंड म्हणून मिळतात. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार आहात ती ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त उशिराने धावत असेल तर तुम्ही सहजपणे रिफंड मागू शकता. मात्र, ही सुविधा कन्फर्म तत्काळ तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध नाही. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट असेल तर तुम्ही त्यासाठी रिफंडचा दावा करू शकत नाही. पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना ना तिकीट जमा पावती दाखल करावी लागेल. तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन TDR दाखल करू शकता. याशिवाय, तुम्ही तिकीट काउंटरवर जाऊन सुद्धा रिफंडचा दावा करू शकता. रेल्वेच्या नियमांनुसार, (Indian Railways Rules) TDR दाखल केल्यानंतर ९० दिवसांच्या आत रिफंडचे पैसे तुम्हाला परत मिळतील.

ऑनलाइन TDR फाइल करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे- Indian Railways Rules

सर्वात आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
आता ‘सेवा’ पर्यायावर जा आणि “फाइल तिकीट ठेव पावती (TDR)” वर क्लिक करा.
यानंतर, My Transactions टॅबमध्ये “फाइल TDR” निवडा.
आता तुम्हाला क्लेम रिक्वेस्ट पाठवायची आहे. हि रिक्वेष्ट स्वीकारल्यानंतर, तुम्हाला काही दिवसात रिफंड मिळेल.
तुमचा रिफंड त्याच बँक खात्यात येईल ज्यामधून तिकीट बुक केले गेले आहे.