Indian Railways Rules : रेल्वेने प्रवास करताय?? तिकीट चेकिंगचा नियम जाणून घ्या

Indian Railways Rules
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Rules । आपल्यापैकी बहुतेक जण दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. त्यात महत्वाचे म्हणजे तो प्रवास शक्यतो आरक्षित तिकिटाने करतो. कारण दूरच्या प्रवासाला प्रवासांना आरामाची आवश्यकता असते. पण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात आरक्षित डब्बात विना तिकीट करणाऱ्या प्रवासाची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आरक्षित डब्ब्यात सतत तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. पण याचा भलताच त्रास प्रवासांना होत आहे.. सततच्या तिकीट तपासणीमुळे प्रवाशांची रात्रीच्या वेळी झोपमोड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण रात्रीच्या वेळी तिकीट तपासण्याचा अधिकार तिकीट चेकरला आहे का? तिकीट चेकर तुमचे तिकीट केव्हा तपासू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? हीच माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

तिकीट चेकर केव्हा तिकीट तपासू शकतो? Indian Railways Rules

रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभाग नवनवीन नियम जारी करत असते. प्रत्येक नियमाचा उद्देश हाच असतो कि प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळावी आणि कोणताही त्रास होऊ नये. तिकीट चेकिंगचा नियम सुद्धा प्रवाशांचे हिट लक्ष्यात घेऊनच करण्यात आला आहे. रेल्वेचा नियम पहिला (Indian Railways Rules) तर तिकीट तपासणी अधिकारी हे रात्री १० नंतर तपासणी करू शकत नाही. प्रवाशांना रात्री शांत झोपता यावी म्हणून हा नियम करण्यात आला आहे. परंतु जर एखादा प्रवासी रात्री १० वाजल्यानंतर ट्रेनमध्ये चढला तर त्या विशिष्ट परिस्थितीत टीटीईला तिकीट तपासण्याची परवानगी आहे. परंतु कधीही कोणाला उठवून तुझं तिकीट दाखव असं म्हणण्याचा अधिकार तिकीट चेकरला नाही.

खरं तर रेल्वे प्रशासन चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहते. पण प्रवाशी हे नियम (Indian Railways Rules) माहित नसल्याने तक्रार करत नाहीत. आरक्षित डब्ब्यात रात्री १० नंतर दिवे बंद केले जातात. तसेच मोठ्याने गाने लावण्यास सुद्धा प्रतिबंध असतात. अगदी फोन वरती हि मोठ्याने बोलता येत नाही. रात्रीच्या वेळी सफाई कर्मचाऱ्यांची हालचाल देखील कमी केली जाते. हे सर्व नियम प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व आनंदी व्हावा म्हणून काळजी घेतली जाते.म्हणून प्रत्येक प्रवासांनी या नियमाचा वापर केला पाहिजे.आणि आपलं प्रवास सुखाचा करून घेतला पाहिजे. जर तुम्हाला कोणती अडचण वाटली तर तुम्ही रेल्वे विभागाकडे तक्रार सुद्धा करू शकता.