काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत : आ. जयकुमार गोरेंचा आ. रामराजेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा खोचक टोला आ. जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला.

विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात जोरदार रंगू लागली आहे. यावर बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे म्हणाले, याबाबत मला काही कल्पना नाही. मात्र, सत्ता आल्यावर अनेक लोक सत्ताधारी पक्षात येण्याचा प्रयत्न करतात. रामराजेंना पक्षात घेतल्यास माझ्या वाट्याला संघर्ष आला तर त्याचा विचार नक्कीच केला जाईल. रामराजेंना पक्षात घेण्याचा निर्णय पक्ष करेल.

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत : जयकुमार गोरेंचा रामराजेंना टोला

 

काही लोक वर्षानुवर्ष सत्तेशिवाय काम करतात, पण काही लोकांना सत्तेशिवाय काम करण्याची सवय लागली पाहिजे. सत्ता नसताना जिल्हा परिषद, जिल्हा बँक जिंकून दाखवा मग तुम्हाला आम्ही सर्टिफिकेट देऊन असा खोचक टोला रामराजेंना आ. जयकुमार गोरेंनी लागवला.

Leave a Comment