“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. कन्सल्टंशीसारखे इडीचे आणि भाजपचे काम सुरु आहे, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली.

कराड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगायचे झाले तर एक प्रकारे ओढून ताणून मलिक यांना अडचणीत आणण्याचा ड्रयूष्टीने हे प्रकरण तयार करण्यात आलेले आहे.

राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केले. त्याबाबत सांगायचे झाले तर रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते हा निर्णय न्यायलयाने दिला आहे. याबाबत वाद निर्माण करण्याची गरज नाही, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले.

Leave a Comment