मुख्यमंत्र्यांच्या ‘पैलवान’ वक्तव्यावरून जयंत पाटलांना हसू आवरेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार प्रचार सभेत आपण तेल लावून लढाईसाठी तयार आहोत असे सांगत आहेत, मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळूदेत कि तेल लावलेला मुख्यमंत्री कसा दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत असताना जयंत पाटील यांना आपले हसू आवरता आले नाही. सांगलीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बठकीसाठी जयंत पाटील हे आले असता त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, विरोधक तेल लावून तयार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. आम्ही जर तयार नाही तर महाराष्ट्रात दिल्लीतील नेत्यांच्या सभा कशाला होत आहेत.

पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या सभेची गरज त्यांना का वाटते? असा प्रश्न उपस्थित करत. २० ठिकाणी अमित शहा आणि १० ठिकाणी पंतप्रधान सभा घेत आहेत. आपल्याकडे मुलगा नापास झाला कि त्याच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून घेतले जाते. तसेच मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात नापास झाले आहेत. म्हणून त्यांचे वडीलधारी हे दिल्ली वरून इथे आलेले आहेत. ते गावो गावी फिरत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment