कालीचरण महाराजांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; नवाब मलिक संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे थेट पडसाद विधानसभेत उमटले आहेत. कालीचरण महाराज यांना अटक करून त्यांच्यावर राष्ट्रादोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. कालीचरण महाराज ने आपल्या राष्ट्रपित्याला शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याने देशभर, जगभर महात्मा गांधीचा अपमान केला आहे. बापूंच्या विचाराचा विरोध होऊ शकतो. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या खुन्याचे गोडवे गायले जात आहे त्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करून त्यांच्यावर राष्ट्रादोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

मुंडे साहेब रोज शरद पवारांवर आरोप करायचे..अन् जेव्हा गोपिनाथ मुंडेंवर प्राणघातक हल्ला झाला..

कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले-

छत्तीगडची येथील धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे

Leave a Comment