“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे अन त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यासह इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असल्याने भाजप नेत्यांकडून आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कालच्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे आणि कालच्या कोर्टातील निकालामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. हे गोवा आणि यूपीमधील जनतेने दाखवून दिले आहे, असेही सोमय्या यांनी यावेळी म्हंटले.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोवा विधानसभा निवडणुकीत जी काही स्टंटबाजी झाली. त्या ठिकाणी संजय राऊत यांनी जी स्टंटबाजी केली. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काही साध्य होत नाही. काल उच्च न्यायालयातही ठाकरे यांनी स्वतःची इज्जत घालवून घेतली. सामनामध्येही म्हंटले आहे की, निल सोमय्या बाबत कोणती चौकशी करणार नाही. मग राऊत यांनी 2 ट्रक कागदपत्रे दिली त्याच काय झालं ? हायकोर्टात ठाकरे यांनी लोटांगण घातलं आहार, असेही सोमय्या यांनी यावेळी म्हंटले.

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी निलवर आरोप केले होते. नीलवर तुम्ही जो अत्याचार केला, त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार आहे. राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा, पुण्यात 77 सेना गुंड होते, त्यात 30 गुंड मुंबई मधील होते, असेही यावेळी सोमय्या यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment