“संजय राऊत तुम्ही कोणाला जोडे मारणार, मला कि रश्मी ठाकरेंना?”; किरीट सोमय्यांचे उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या हे दलाल आहेत, असा आरोप केला होता. “ठाकरे सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचे मुलुंडच्या दलालाने सांगितले. राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “१९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात?,”मला कि रश्मी ठाकरे यांना? असा सवाल सोमय्या यांनी केला.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच्यावरआणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी ते म्हणाले की, काळ राऊतांनी मला जोडे मारण्याची भाषा केली. हि भाषा मला नाही तर रश्मी ठाकरेंना संबोधून केली आहे. १९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे.

एवढेच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. हा कर किरीट सोमय्यांनी भरलेला नाही. त्यामुळे राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात? १ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे.

११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसंच व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

Leave a Comment