“मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली”; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अन्वय नाईक यांच्या हत्येला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान त्याच्या आरॊपनंतर सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. “मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे तुरुंगात आहे. तो शिवसेनेचा प्रवक्ता होता. शिवसेनेनेच मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी दिली आहे,” असा गौप्यस्फोट सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज कोर्लईगावात जाऊन ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी संवाद साधला. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,”मनसुख हिरेनची ज्यावेळी हत्या झाली. सुपारी कुणी दिली? कुणी घेतली? शिवसेनेचा प्रवक्ता सचिन वाझेंनी मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी दिली.

त्याची पोलीस दलात बेकायदेशीरपणे नियुक्ती केली गेली. सुपारी शिवसेनेने दिली. अशा प्रकारे हत्या होत असेल तर त्याला वाद-विवाद म्हणत नाही. त्याला माफीया सरकारच्या विरोधातील संघर्ष म्हणता येईल, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Leave a Comment