किसनवीर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढा !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील किसनवीर साखर कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी संचालक मंडळाला सोबत घेऊन किसनवीर सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राज्य शासनाने राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून किसनवीर कारखान्याच्या आर्थिक देणी करिता मदत करावी, अशी मागणी संचालक मंडळाच्या वतीने आमदार मकरंद पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांनी केली.

आमदार मकरंद पाटील, नितीन काका पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याशी किसनवीर कारखान्याच्या सर्व अडचणीबाबत सुमारे सव्वा तास चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये संचालकांनी कारखान्याची मूळ थकीत रक्कम, थकीत देणी बंद पडलेल्या प्रकल्पांची परिस्थिती, गाळप हंगाम तसेच खंडाळा सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाना यांच्यासाठी झालेला खर्च इतर अतिरिक्त देणे आणि लागू झालेले व्याज याची सविस्तर माहिती दिली.

तसेच राज्य शासनाने सहकार क्षेत्रातील शिखर बँक असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक देणे इन करता मदत करावी. आणि 52 हजार शेतकऱ्यांची मालकी कारखान्यावर कायम राहावी या दोन मागण्या या बैठकीमध्ये संचालकांनी अजित पवार यांच्याकडे केल्या. तसेच या संदर्भामध्ये राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जफेड करता कोणती सकारात्मक पावले उचलता येतील. याची लवकरच चर्चा करून योग्य तो तोडगा काढू. तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमुक्ती चा प्रवास लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाला दिली.

Leave a Comment