दीड एकरवरील कांद्याचे पीक चोरट्यानी केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | पावसाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे. कसेबसे पिकांना वाढविले, मात्र तोंडी आलेले पीक आता चोरटे लंपास करीत असल्याने निसर्ग पिकू देईनात आणि चोरटे विकू देईनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. अशीच घटना गंगापूर तालुक्यात घडली आली आहे. दीड ते दोन लाख रुपये किंमत असलेल्या शेतातील दीड एकरवरील कांद्याचे उभे पीक रातोरात चोरट्यानी लंपास केले आहे.

या भागातील शेतकरी मनोज फुके (रा. धामोरी बुद्रुक, ता. गंगापूर, जि. अहेमदनगर) हे बटाईने शेती करतात. त्यांनी चार एकरवर कांद्याची पेरणी केली होती. मात्र शुक्रवारी रात्री चोरट्यांनी शेतातील कांदा रातोरात गायब केला. यामुळे शेतक-याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुढे कसे होणार, असा प्रश्न फुके यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

दरवर्षी कांद्याच्या बियाणाला मोठी मागणी असून हे बियाणे चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकले जातात. त्यामुळेच फुके यांनी शेतात कांद्याची पेरणी केली होती. पीक काढणीला आल्याने शुक्रवारी चार एकरवरील काही पिकांची काढणी केली होती. तर उर्वरित काढणी ते आज करणार होते. मात्र रात्रीच्या सुमारास चोरट्यानी त्यांच्या शेतातील दीड एकरवरील पीक कापून नेले. ही बाब सकाळी फुके हे शेतात गेल्यावर समोर आली. सुमारे दीड ते दोन लाखाचा पीक चोरट्यानी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दुपारपर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment