औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान लाईन ब्लॉक, ‘ही’ रेल्वे धावणार उशिरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान उड्डाण पुलाच्या बांधकामा करिता आजपासून 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा लाईन ब्लॉक चार दिवस असेल. यामुळे तपोवन एक्स्प्रेस चार दिवस 30 मिनिटे उशिरा धावणार आहे.

औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान किलो मीटर 110/5-6 वर असलेल्या रेल्वे उड्डाणपुला शेजारी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करण्या करिता दिनांक 12 ते 15 जानेवारी, 2022 दरम्यान चार दिवस सकाळी 10.30 ते 13.30 दरम्यान तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे.

या लाईन ब्लॉकमुळे गाडी संख्या 17617 मुंबई सी.एस.टी. ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस या चार दिवशी मनमाड ते दौलताबाद दरम्यान 30 मिनिटे उशिरा धावेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Comment