गुड न्यूज! येत्या 25 मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशांतर्गत विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यांनतर वाढत्या लॉकडाऊनच्या कालावधीमुळं गेल्या ५० दिवसांपेक्षा जास्त काळापासून भारतातील हवाई सेवा बंद आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणत असताना केंद्रानं हवाई सेवेचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे, अशी माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सुरु झाल्यानं देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. देशभरात येत्या 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान देशांर्गत हवाई वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करुन सांगितलं की, 25 मे पासून देशांर्तग हवाई वाहतूक सुरु केली जाणार आहे. सर्व विमानतळांना 25 मे पासून सेवा देण्यास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक बंद असल्यानं विमान कंपन्यांना मोठं नुकसान होत आहे. अशावेळी पुन्हा हवाई वाहतूक सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानं विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment