‘या’ जागेवरून पवार – विखे पाटील यांच्यात वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | महाआघाडीच्या जागावाटप ८ तारखेपर्यंत करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी पुण्यातील एक कार्यक्रमात बोलत असताना सांगितले. या जागावाटपात अहमदनगर च्या जागेबद्दल पवार आणि विखे पाटील यांच्यात गोंधळ सुरु आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने लढवावी का राष्ट्रवादीने याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र नगरची जागा राष्ट्रवादीची होती आणि राहणार असे पवार यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी पक्षाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, राजू शेट्टी यांनी दोन जागांची मागणी केली आहे, मात्र पवारांनी एक जागा देण्याचे स्पष्ट केले आहे. यावर राजू शेट्टी यांच्याशी चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसलाही त्यांच्याकडील एक जागा राजू शेट्टी यांना देण्याची विनंती केली असल्याचे ते म्हणाले.

वंचित बहुजन विकास आघाडीला ४ जागा देण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी तयार असल्याचे ते म्हणाले. याबाबत काय निर्णय घ्यायचे हे आंबेडकरांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरची जागा काँग्रेससाठी सोडायची याबद्दल शरद पवार काहीच बोलले नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

 

इतर महत्वाचे – 

सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार

महाबळेश्वर येथे मधोत्पादन कसे केले जाते?

भिलार एक पुस्तकांचं गाव ||

Leave a Comment