व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यात तब्ब्ल ९५ हजार गुन्ह्यांची नोंद; ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

मुंबई । राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले गेले आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम १८८ नुसार ९५,६७८ गुन्हे नोंद झाले असून १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२७९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५३,०७१ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लाँकडाऊन च्या काळात या १०० नंबर वर ८४,९४५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६४२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,११,६३८ व्यक्ती Quarantine आहेत अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.