Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांना थेट या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

Manoj Jarange Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबल सुरु असताना आणि सर्वच राजकीय पक्ष त्या तयारीला लागले असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलने करणारे आणि सरकारला सळो कि पळो करून सोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) एका पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करून मुंडे यांनी त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोज जरांगे पाटील यांना ऑफर दिली होती . मनोज जरांगे पाटील यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी विनंती करूणा मुंडे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या करूणा मुंडे?

करुणा मुंडे (Karuna Munde) यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेऊन गेली होती. मी त्या निवेदनात म्हंटल होत कि, आपण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. जरांगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे. त्यामुळे तुम्ही माझे निवदेन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. मला पार्टीचे कोणतेही पद नको, कोणतेही तिकीट नको. फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारा आणि नवनवीन लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या अशी विनंती मी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे केली होती असं करुणा मुंडे यांनी म्हंटल.

जरांगे पाटलांचे उत्तर काय आले? Manoj Jarange Patil

करुणा मुंडे यांची हि विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली नाही. जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत ही विनंती नाकारली. मी एक समाजकारणी माणूस आहे. मी समाजासाठी लढतो असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी हे अध्यक्षपदाची मागणी नाकारल्याचे करुणा मुंडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.