महाराष्ट्र नारायण राणेंना विसरला, त्यांच्यावर बोलणे योग्य नाही; शंभूराज देसाईंनी उडविली राणेंची खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नारायण राणे यांचे नांव महाराष्ट्र विसरला आहे. कारण त्याच्याच पक्षात त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यावर बोलणं आणि त्यांना अधिक महत्व देणे मला काय योग्य वाटत नसल्याचे म्हणत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला आहे.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेव्हा नारायण राणेच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याचा प्रश्न विचारला असात ते बोलत होते. नारायण राणे यांच्याविषयी प्रश्न विचारता शंभूराज देसाई म्हणाले, कुणी… कुणी अन कोण- कोण असे म्हणत आता त्यांना म्हणजे नारायण राणेंना महाराष्ट्र विसरला असल्याचे वक्तव्य करत त्यांची खिल्ली उ़डविली.

तसेच सचिन वाझे प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून योग्य रीतीने चालू होता. तपास योग्य दिशेने चालू असताना केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. अस म्हणत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment