निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महागणार; सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक (Loksabah Election) संपल्यानंतर कोट्यावधी मोबाईल युजर्स एक मोठा धक्का बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक संपताच टेलिकॉम कंपन्या मोबाइल टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेणार आहे. या किमतीत तब्बल 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. या निर्णयामुळे कंपन्यांच्या महसूलात दुपटीने वाढ होईल. मात्र दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge Plans) करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

ब्रोकरेज फर्म अ‍ॅक्सिस कॅपिटलने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, टेलिकॉम कंपन्यानी 5G सुविधेत मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे कंपन्या त्यांना अधिक नफा कसा होईल, याकडे लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढवण्याचा विचार करत आहेत. या किंमती फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागातही वाढवल्या जातील. यात पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन पूर्वीच्या किंमतींपेक्षा अधिक महाग होऊ शकतात.

किती रुपयांनी रिचार्ज प्लॅन महागणार??

रिचार्ज प्लॅनच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्यानंतर याचा सर्वसामान्यांना फटका बसेल. रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढल्यानंतर तुम्ही जर दरमहा 200 रुपयांचा रिचार्ज करत तर तुम्हाला पन्नास रुपये अधिक मोजावे लागतात. म्हणजे 240 साठी 250 रुपये भरावे लागतील. तसेच एक हजार रुपयांच्या रिचार्ज करता 250 रूपये अधिक मोजावे लागतील.

या नव्या अहवालानुसार, रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढल्यानंतर टेलिकॉम कंपनीच्या मूळ रिचार्जच्या किमतीही वाढवल्या जातील. यात एअरटेलच्या मूळ किमतीत 29 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. जिओमध्ये 26 रुपयांची वाढ केली जाऊ शकते. खरे तर, टेलिकॉम कंपन्यांनी वर्ष 2019 आणि 2023 या कालावधीमध्येच रिचार्ज प्लॅनमध्ये तिपटीने वाढ केली आहे. आता पुन्हा या किमती वाढवल्या जाणार आहेत.