मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी गरीब कुटुंबांना देत आहे 50 हजार रुपये ? या बातमी मागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । पंतप्रधान योजनांच्या नावावरही अनेक घोटाळे समोर येत आहेत. ज्यांच्या नावाने निरपराध लोकांना फसवले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक अशीच पोस्ट व्हायरल होत आहे. यावेळी एक वेबसाइट असा दावा करत आहे की, केंद्र सरकार मुलींच्या लग्नासाठी ‘प्रधानमंत्री बालिका अनुदान योजने’ अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना (BPL) 50,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे.

सत्य काय आहे ते जाणून घ्या – व्हायरल होणारी बातमी पूर्णपणे खोटी आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नाही. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (PIB) व्हायरल झालेल्या या बातमीला बनावट असल्याचे सांगताना स्पष्टीकरण दिले की, सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही.

पीआयबी फॅक्ट चेकचे ट्विटर हँडलने लिहिले आहे- ‘दावाः एक वेबसाइट दावा करीत आहे की’ प्रधानमंत्री बालिका अनुदान योजने ‘अंतर्गत BPL प्रवर्गाच्या मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकार 50,000 रुपयांची आर्थिक मदत करेल. PIBFactCheck: हा दावा बनावट आहे. अशी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवित नाही. ‘

या वेबसाइटवर असे लिहिले गेले आहे की, देशातील दारिद्र्यरेषेखालील BPL प्रवर्गाच्या मुलींना फायदा व्हावा यासाठी आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालिका अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील BPL प्रवर्गाच्या जास्तीत जास्त दोन मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकारतर्फे 50,000 रुपयांची आर्थिक मदत तर सर्वसाधारण गटातील BPL कुटुंबातील विधवा महिलांच्या दोन मुलींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment